वरवंड येथून एटीएम मशिनसह 7 लाख 13 हजार रुपये चोरुन नेणारी सराईत टोळी जेरबंद

केडगाव : दौंड तालुक्यातील वरवंड येथे असणारे इंडिया वन कंपनीचे अख्खे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या यवत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यवत पोलिसांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मोबीन आलज बिल्ला नजीर आणि अब्दुल करीम नूर हसन कुरेशी या दोन आरोपिंना जळगाव येथून ताब्यात घेत अटक केली असून त्यांच्यासोबत अन्य कोण कोण आरोपी होते याचा तपास सुरु आहे.

दिनांक २ मार्च २०२६ रोजी वरवंड येथे अब्दुल पटेल यांच्या मालकीच्या गाळ्यात इंडिया वन कंपनीचे असलेले हे एटीएम मशीन आणि त्यातील ७ लाख १३ हजार ३०० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला होता. थेट एटीएम मशीनच उखडून घेऊन गेल्याने संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ माजली होती. आरोपिंना मुद्देमालासह पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे यवत पोलिसांनी आरोपिंचा माग काढत वरवंड येथील सिसिटीव्ही फुटेज आणि डम डाटा तपासनी केली. या तांत्रिक बाबींमुळे पोलिसांना आरोपिंचे धागेदोरे सापडले आणि त्यांचा छडा लावण्यास मोठी मदत मिळाली. या कारवाईमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एटीएम चोरीच्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक संदिपसिह गिल, गणेश बिरादार (अपर पोलीस अधिक्षक बारामती) बापूसाहेब दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड) यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलिस हवालदा गुरूनाथ गायकवाड, संदीप देवकर, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, विकास कापरे, दत्ता काळे, पोलिस कॉन्स्टेबल मारूती बाराते, सचिन गुंड,गंड, किरण तुपे, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली आहे.