औरंगाबादच्या ‘या’ महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री संतापले! म्हणाले, मला कारणे सांगू नका, मार्ग काढा
औरंगाबाद
मला कारणे सांगू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागेल. त्यामुळे सध्या किती आणि कसे पाणी वाढवून देता येईल याकडे लक्ष द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी दिले आहेत.