राजकीय उलथापालथ! देवेंद्र फडणवीस यांच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागले सर्वांचे लक्ष



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

काही दिवसांपासून राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. यातच आज भाजप ने आपले सर्व  १०५ आमदार मुंबईत बोलावले आहेत त्यामुळे आज सायंकाळी ४ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात सध्या राजकीय वारे तप्त होत चालले असून राज्यातील प्रमुख राजकीय  नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतल्याने यामध्ये आता जास्तच सस्पेन्स निर्माण होत चालला आहे. येणाऱ्या एक दोन दिवसात राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय पक्षांच्या गोटातून पुढे येत आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमके काय ते नक्कीच पुढे येईल असेही राजकीय जाणकार आपले मत व्यक्त करत आहेत.