अख्तर काझी
दौंड : ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 5 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थीनींना राज्य परीवहन महामंडळातर्फे मोफत पास देण्यात येतात. कै भाऊसाहेब माध्यमिक विद्यालय माळेवाडी येथे खोरोडी, वागदरा, येडेवस्ती, मसनेरवाडी, लिंगाळी, माळेवाडी येथील विद्यार्थ्यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे. या ग्रामिण भागातील सर्व मुलींना राज्य परीवहनच्या कर्मचाऱ्यांकडून शाळेत जाऊन मोफत पास देण्यात आले.
यावेळी नरवडे सर, भागवत सर, पठारे सर, सावंत सर, वाहतुक नियंत्रक दत्तात्रय तिगोटे (दौंड आगार) उपस्थित होते. या योजनेचा लाभ दौंड तालुक्यातील सर्व शाळेतील मुलींना घेता येईल असे आवाहन वाहतुक निरीक्षक प्रतीक अनाके यांनी केले तर शाळेत येवून मुलींना मोफत पास वाटप केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष महेश भागवत व मुख्याध्यापक येडे सर यांनी राज्य परीवहन महामंडळाचे आभार मानले.