Budget 2021 – कोरोनातून वाचलेल्या लोकांना पुन्हा मरणाच्या दारात लोटलं : उप मुख्यमंत्री अजित पवार



मुंबई : सहकारनामा

जागतिक महामारी असणाऱ्या कोरोनाची  लस शोधून आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी लोकांना जीवदान दिले मात्र असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं Budget 2021 ने  भारतातील लोकांना पुन्हा मरणाच्या दारात लोटलं आहे अशी टिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे.

पुढे याबाबत बोलताना त्यांनी आपल्या येथील गरीब आणि आर्थिक स्थिती बिकट असणाऱ्या मागासवर्गीय, अल्पसंख्यांक तसेच आदिवासी बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा या अर्थसंकल्पात कायम दिसत असून महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही असे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य हे देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देते मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला आहे. राज्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटी केले आहे.