आज जनता कर्फ्यु: नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन



: सहकारनामा ऑनलाइन

– संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आता नागरिकांनीच स्वतःला पायबंद घालून घेण्याची वेळ आली असून आज २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  या जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करण्यासाठी राज्यासह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. महा भयंकर महामारी असलेल्या ‘करोना’ला यामुळे शह मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या व्हायरसशी लढण्यासाठी उपाययोजना करताना मोठे निर्णय घेतले असून मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही महानगरे 31 मार्चपर्यंत बंद राहतील असे मागेच जाहीर केले आहे.