राज्यातून राज्यसभेवरील सर्व उमेदवार बिनविरोध



मुंबई : सहकारनामा

राज्यातून राज्यसभेवर सात जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बुधवारी  केली आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते केवळ विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता राहिली होती. राज्यातून या सात जागांसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले, भागवत कराड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांसह फौजिया खान, काँग्रेसकडून राजीव सातव, आणि शिवसेनेतर्फे प्रियांका चतुर्वेदी हे बिनविरोध झाले आहेत.