Coronavirus: रविवारी जनता कर्फ्यु-पंतप्रधान मोदी



दिल्ली : वृत्तसेवा

जगामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा  मुकाबला करण्यासाठी येत्या रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते सायंकळी ७ या कालावधीत “जनता कर्फ्यू” आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. जनता कर्फ्युबाबत माहिती देताना त्यांनी जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने जनतेसाठी आयोजित केलेला कर्फ्यू असून जनता कर्फ्यू काळात कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, घोळक्याने समाजात एकत्र जमू नये असे सांगत त्यांनी अत्यावश्यक सेवा देणारे जे लोक आहेत त्यांनीच फक्त घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे. आत्मसन्मान ही देशभक्तीच असून देशातील सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी केले आहे.