बाटलीबंद पाणी, मिनरल वॉटर बाबत झाला मोठा निर्णय! FSSAI ने उत्पादकांना केले BIS प्रमाणपत्र अनिवार्य



National : 

फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड्स अथोरिटी ऑफ इंडिया Food Safety and Standards Authority of India म्हणजेच 

FSSAI ने आता बाटलीबंद, पॅकेज पाणी आणि मिनरल वॉटर उत्पादकांसाठी बीआयएस BIS प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. 

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात FSSAI ने ही सूचना दिली आहे. मार्च महिना संपताच दि. 1 एप्रिल 2021 रोजी आता हे नियम लागू होऊन ते अंमलात येणार आहे.

फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड्स अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (FSSAI) ने पॅकेज केलेले पाणी आणि मिनरल वॉटर असलेल्या कंपन्यांचे लायसन मिळविण्यासाठी किंवा त्याची नोंदणी करण्यासाठी आता भारतीय मानक ब्युरो (BIS) चे सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. FSSAI ने ही सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2008 नुसार, सर्व खाद्य व्यवसाय संचालकांना (FBO) कोणताही खाद्य व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परवाना / नोंदणी घेणे बंधनकारक असणार आहे.

अन्न सुरक्षा आणि मानक (प्रतिबंध आणि विक्रीवरील निर्बंध) विनियम २०११ नुसार, BIS  चिन्हानंतरच कोणीही पॅकेजबंद पिण्याचे पाणी किंवा मिनरल वॉटर विकू शकणार आहे.