महावितरणकडून शेतकऱ्यांवर होत असलेली कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा… : आमदार राहुल कुल

पुणे : मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, पूर, कोरडा दुष्काळा, ओला दुष्काळ, वादळ अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटाचा आघात होत असून यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाला आहे. त्यातच सक्तीने वीज बिलवसुली देखील सुरु झाली आहे, यामध्ये भर म्हणून कि, काय आता थकीत वीज बिलापोटी कृषीपंपाचे पॅनेल, स्टार्टर बॉक्स, विद्युत जोडणीची केबल सक्तीने काढून नेण्याचे काम महावितरणचे अधिकारी करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला असून, यामुळे काही ठिकाणी वादाच्या घटना देखील घडू शकतात अशी भीती आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली असून हि बेकायदेशीर कारवाई तत्काळ थांबिण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर सुरु असलेली कृषीपंपाचे स्टार्टर, पॅनेल बॉक्स व विद्युत वाहक तारा काढून नेण्याची कारवाई तत्काळ थांबविणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.