केडगाव : भारतीय संस्कृती ही खूप जुनी आणि प्रगल्भ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला जगाने नावाजले असून आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना इतर धर्मियांनाही बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपण बजवायला हवी असे मत दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे. ते केडगाव येथील धर्मध्वज अनावरण कार्यक्रमात बोलत होते.
दौंड तालुक्यातील केडगाव येथे सुमारे १०१ फुटाचा धर्मध्वज उभारण्यात आला असून दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल तसेच महंत लक्ष्मणनाथ जी, राहुल महाराज राऊत यांच्या हस्ते या धर्मध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल बोलत होते.
कुल यांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्व उपस्थितांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपला धर्मध्वज हा पवित्रतेचं, शांततेचं आणि निषठेचं प्रतीक आहे. धर्मरक्षण करताना सर्वांनी आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना इतर धर्मियांनाही बरोबर घेऊन चालावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. आज आखातात जे चाललय ते पाहता आपला देश मात्र आजही पूर्णपणे सुरक्षित आहे. आपला इतिहास हा खूप जुना आणि प्रगल्भ आहे. धर्मात उच्च परंपरा आहे तर मॉडर्न जिम ला योगा सरस ठरत. भारताच्या संस्कृतीचा प्रभाव हा परदेशी लोकांवर पडत असून ते आपल्या संस्कृतीकडे सर्वात जुनी आणि प्रगल्भ संस्कृती म्हणून पाहत असल्याचे कुल म्हणाले.
यावेळी त्यांनी ड्रग्स च्या फैलावावर भाष्य करताना ड्रग्स सेवन सारख्या गोष्टींमुळे युवा पिढी बर्बाद होत आहे आणि त्याची चिंता वाटत असल्याचे सांगितले. धर्माची दिशा ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असावी असेही त्यांनी येथे आवर्जून नमूद केले. तालुक्यातील विकास कामांवर बोलताना त्यांनी, तालुक्यातील विविध गाव, आपला केडगाव परिसर आणि सुख सुविधा परिपूर्ण करण्यावर आपला भर असून तालुक्यातील रस्ते आणि विविध विकासकामांवर त्यांनी यावेळी भाष्य केले.
नुकतीच आमदार राहुल कुल यांनी पीएमआरडीए चे नवनियुक्त आयुक्तांची भेट घेत त्यांना ग्रामिण आणि शहर असा दुजाभाव करु नये अशी विनंती केली. सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष जानवत असताना दूरदृष्टीने सूरु करण्यात आलेल्या बेबी कॅनॉलमुळे शेतीच्या पाण्याची अडचण दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी बोलताना त्यांनी, पुढची पिढी ही वैचारिक पिढी म्हणून घडवणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत ‘चांगलं करा पण चांगलं नाही करता आलं तर कमीत कमी कुणाचं वाईट तरी करु नका असा मिश्किल टोला लगावताच एकच हशा पिकला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर महंत लक्ष्मणनाथ जी महाराज, राहुल महाराज राऊत, भीमा पाटस चे विद्यमान संचालक अप्पासाहेब हंडाळ, मा.संचालक किरण देशमुख, विठ्ठल (नाना) शेळके, उपसरपंच भाऊसाहेब शेलार,मा.उप सरपंच अशोक हंडाळ, महादेव (काका) शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धर्मध्वज उभारणीसाठी केडगाव येथील निलेश कुंभार, प्रसाद बारवकर, विठ्ठल (नाना) शेळके, राजू गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता शेळके सर, प्रकाश देशमुख सर आणि निलेश कुंभार यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.






