गळ्यात हात घालून काढलेला ‛तो’ फोटो ठरला त्या 3 मित्रांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो..



पुणे : सहकारनामा

कराड येथे झालेल्या अपघातामध्ये तीन मित्रांचा अंत झाला. या अपघाता अगोदर  या तिन्ही मित्रांनी एकत्र येत गळ्यात हात घालून फोटो काढला होता. मात्र त्यांना यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती की त्यांचा हा फोटो शेवटचाच ठरणार आहे.

कारण या फोटो नंतर हे मित्रा फिरायला गेले आणि येताना त्यांचा भीषण अपघातामध्ये अंत झाला.



हे तिघे मित्र अचानक गेल्याने त्यांच्या आठवणींनी अनेकजणांना गहिवरून आले असून यामध्ये मनसे नेते वसंत मोरे यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने तर सोशल मीडियावरील वातावरण अजूनच भावुक बनले आहे.

‘ये तेरी मेरी यारी, ये दोस्ती हमारी असे म्हणत कै.कु.स्वप्नील शिंदे(फलटण), कै. राहुल दोरगे, (यवत) आणि कै. रविराज साळुंखे (सच्चईमाता डोंगर कात्रज) या तिघा मित्रांनी काढलेले फोटो पाहून अनेक जणांना आपले अश्रू अनावर झाले.

पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनीही या तिघांना आपल्या वेगळ्या शैलीत श्रद्धांजली वाहत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

एकत्र सोबत राहणारे, फिरणारे, फोटो काढणारे मित्र एकत्रच या जगाचा निरोप घेतली यावर अजूनही त्यांच्या मित्र परिवाराला विश्वास बसत नाही.