मराठा व बहुजन समाजाने आचारसंहितेचे पालन करून आपले लग्न सोहळे संपन्न करावेत – राजेंद्र कोंढरे

अख्तर काझी

दौंड :‌‌ आचारसंहिता कोणावर लादायची नसते, प्रत्येक माणसाने स्वतःची विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला जे झेपेल, पटेल,जे समाजाला भावेल असे विवाह सोहळे अपेक्षित आहेत. असे विवाह सोहळे झाले तर, निश्चितपणे भारतीय आणि कृषी जीवनावर, शेती संस्कृतीवर ज्यांचे जीवनमान अवलंबून आहे अशी कुटुंब वर्षानुवर्ष कर्जात बुडतात त्यांच्यासाठी निश्चितपणे समाजाने घालून दिलेला आदर्श पायंडा उपयुक्त ठरेल असे राजेंद्र कोंढरे म्हणाले.

मराठा व बहुजन समाजाचे विवाह सोहळे चालले कोणीकडे या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी दौंड येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दौंड शहर व तालुक्याच्या वतीने सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे बोलत होते. कोंढरे पुढे म्हणाले की, प्री-वेडिंग शूटिंग ऐवजी प्री- मीटिंग होणे गरजेचे आहे.

या मीटिंगमध्ये दोन्ही बाजूचे कुटुंबीय, इच्छुक मुलगा- मुलगी याबाबत चर्चा झाली पाहिजे. ज्यामुळे भविष्यात दोन्ही कुटुंबात जेव्हा होतात ते होणार नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दौंड तालुका मराठा महासंघाने सर्व जाती धर्माच्या लोकांना निमंत्रित करून या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणली.मराठा समाज व बहुजन समाजाच्या लग्न सोहळ्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पारंपारिक व सुसंस्कृत पद्धतीकडून विकृतीकडे या सोहळ्याची वाटचाल झाली आहे. या सोहळ्यांमध्ये बदल होणे आवश्यक असून या संदर्भात चर्चा करण्यात आली व काही निर्णय घेऊन सर्व संमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. त्यानुसार पुढील लग्न सोहळे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मराठा समाज व बहुजन समाजाच्या लग्न सोहळ्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पारंपारिक व सुसंस्कृत पद्धतीकडून विकृतीकडे या सोहळ्याची वाटचाल झाली आहे. या सोहळ्यांमध्ये बदल होणे आवश्यक असून या संदर्भात चर्चा करण्यात आली व काही निर्णय घेऊन सर्व संमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. त्यानुसार पुढील लग्न सोहळे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

• विवाह सोहळा वेळेवर मुहूर्तावरच लावण्यात यावा
• सत्कार व मान्यवरांची भाषणे मुहूर्ताच्या वेळेच्या अगोदरच संपन्न व्हावीत.
’ दोन्ही कुटुंबियांनी परस्पर संमतीने खर्च विभागावा.
• डीजे चा वापर टाळावा, बँड किंवा मोठ्या आवाजाच्या यंत्राचा वापर मर्यादेत करावा पारंपारिक वाद्याचा वापर असावा.
• सर्व लग्न कार्यक्रम, म्हणजे साखरपुडा, हळद, लग्न एका दिवसातच पुर्ण करावीत.
• भेटवस्तू देण्याऐवजी रोख रकमेचा आहेर करावा.
• जेवणातील पदार्थ मर्यादित असावीत, अन्नाची नासाडी टाळावी अशी आचारसंहिता निश्चित करण्यात आली.

नंदू भाऊ पवार, आप्पासाहेब पवार, विरधवल जगदाळे, अँड.प्रियंका काटे, हरिभाऊ ठोंबरे, महेश भागवत, सोमनाथ लवंगे, आबा वाघमारे, श्रीकांत काटे, विकास देशपांडे, गणेश हिरनावळे, उल्हास मिसाळ, मतीन शेख, शौकत सय्यद, अमोल काळे, अनिल जांभळे, रुपेश बंड, रवी पवार, राजेंद्र जगताप, सुनिल पवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शहर व तालुक्यातील मराठा व बहुजन समाजातील पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम पवार, दादासाहेब नांदखिले, रोहन घारेपडे, महेंद्र देसाई, विकास जगदाळे, प्रताप खानविलकर, अभिषेक गायकवाड, अविनाश गाठे,गणेश घोलप, मनोज फाळके,वैभव जठार,शंतुन निंबाळकर, आकाश गणेशकर, सज्जन काकडे, योगेश कराळे, सचिन मोहिते, संतोष जाधव, राहुल पवार, अमित कदम यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विनय लोटके तर सुत्रसंचलन रवि पवार आणि आभार शैलेश पवार यांनी मानले.