पुणे : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे (shivsena mla) अनेक आमदार गुवाहाटी (mla in guvahati) येथे स्थलांतरित केल्याने राज्यात सरकारची वाटचाल अस्थिरतेकडे होताना दिसत आहे. यातूनच महाविकास आघाडी सरकार (mva) आणि बंडखोर आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी नुकतीच बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती आणि आसाममध्ये पूरस्थिती असताना तिकडे पंचतारांकित हॉटेल्समध्ये मजा काय मारताय कमीत कमी तेथील लोकांची मदत तरी करा असा खोचक सल्ला त्यांना दिला होता.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या टिकेला आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतीतून समर्पक उत्तर देताना दिसत असून त्यांनी आसाम मुख्यमंत्री निधित पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्यात सध्या सत्तेत असलेले महाविकास आघाडीचेच सरकार राहणार की बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजप चे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होणार आहे.
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा