राज्यात मोगलाई माजलीय..! नामांतर राहू दे, अगोदर सुरक्षितता द्या..
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ७ दरोडेखोरांनी चाकू, कु-हाडीचा धाक दाखवत १५ दिवसांची ओली बाळंतीण आणि ८ महिने गरोदर महिलेवर सामुहीक बलात्कार केला आहे. राज्यात मोगलाई अवतरलीये रोज दरोडे बलात्कार होताहेत.
जराही लाज शिल्लक असेल तर नामांतर राहू दे, पण निदान सुरक्षितता तरी प्रदान करा… अशी टीका भाजपच्या चित्रा वाघ यांनी राज्यसरकारवर केली आहे.
औरंगाबाद येथे काल रात्री दरोडेखोरांनी पैठण तालुक्यातील एका गावावर हल्ला करत तेथील वस्तीवर असणाऱ्या दोन महिलांवर अमानुष अत्याचार करत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे, मात्र हि घटना घडल्यानंतर आता राजकीय आरोपांना सुरुवात झाली असून राज्य सरकारने औरंगाबादचे नामकरण राहू द्या पण सुरक्षितता तरी द्या असा टोला चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लागावत राज्यात मोगलाई माजली आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
औरंगाबाद जिल्हा 7 दरोडेखोरांचा चाकू
कु-हाडीचा धाक दाखवत १५ दिवसांची ओली बाळंतीण व ८ महिने गरोदर महिलेवर सामुहीक बलात्कार
राज्यात मोगलाई अवतरलीये
रोज दरोडे बलात्कार होताहेत
जराही लाज शिल्लक असेल तर नामांतर राहू दे पण निदान सुरक्षितता तरी प्रदान करा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/UNaCuIslZt— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 20, 2021