मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सरकारने ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (सुमित सोनवणे)

महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळ वणवण भटकत, उन, वीज, वारा, पाऊस यांचा विचार न करता तसेच. आपला जीव धोक्यात घालून मेंढ्या सांभाळत आहेत, वीज पडून अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत, अनेक मेंढपाळांनी जीव गमावला आहे अशी संकट येत असताना माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे की नाही असा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा संकटाच्या काळात माणुसकी दाखवणे गरजेचे आहे परंतु काही  लोक मेंढपाळांवर सातत्याने अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकरण घडत आहेत. मेंढपाळांवर  होत असलेले हल्ले रोखले पाहिजेत महिलांना मारहाण, अमानुषपणे अत्याचार होत आहेत तसेच अनेक ठिकाणी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले, होत आहेत दिवसेंदिवस हल्ले करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे मेंढपाळांना ॲट्रॉसिटी सारखे संरक्षण मिळावे समाज कंटकांकडून होणारी अरेरावी, जातीवाचक शिवीगाळ, मेंढ्या चोरून नेणे, काही गावात स्थानिक लोकांकडून मेंढपाळ समाज बांधवांना मारहाण, तसेच काही ठिकाणी मेंढपाळांनी आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर देखील कारवाई करावी.

असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष संदीपान वाघमोडे यांनी निवेदनाद्वारे दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि दौंडचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

सरकारने यापुढे हल्ले करणाऱ्यांना जरब बसेल असे शासन केले पाहिजे, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे तसेच मेंढपाळांच्या मुलांसाठी चालती शाळा सुरू करावी आशा मागण्या करण्यात आल्या आहे.