शेतकरी कर्ज माफी मध्ये पतसंस्थांचाही समावेश करावा

पुणे : जून 2026 मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीमध्ये सर्व प्रकारच्या पतसंस्थांचाही सहभाग करावा अशा प्रकारची मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली आहे.

सहकारी, सरकारी व खाजगी बँका प्रमाणेच सर्व प्रकारच्या पतसंस्थांमध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा वरती असलेल्या थकीत कर्जाचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातील पतसंस्था मध्ये आपल्या सात बारा वरती कर्ज काढलेले आहे.

अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी ग्रामीण भागातील पतसंस्थांचा सहभाग इतर बँका प्रमाणे कर्जमाफी मध्ये केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे शासनाने इतर बँका प्रमाणे पतसंस्थांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा कर्ज माफ करण्यात यावे. अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.