रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाखाची मदत



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ₹ ५ लाख मदत जाहीर केली आहे.

जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.