ज्यावेळी अजितदादांच्या पक्षाला गरज होती त्यावेळी यांनी पळ काढला अण आता भावनिक आवाहन करतात.. जनता दौंडचा विकास करणाऱ्यांना मोठ्या फरकाने निवडून देईल – किरण देशमुख

दौंड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आता उमेदवारांकडून वेगवेगळ्या युक्त्या केल्या जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर एआय तंत्रज्ञानाची मदत घेऊन अजितदादांच्या आवाजात तयार केलेली एक क्लिप प्रचारात वापरली जात आहे आणि या क्लिपद्वारे त्यांच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे भावनिक आवाहन मतदारांना केले जात आहे. मात्र आता क्लिप लावून भावनिक करु पाहणाऱ्या उमेदवारांना विरोधी गटाने चांगलीच फटकार लावली आहे.

भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक किरण देशमुख यांनी या सर्व प्रकारावर टिका केली असून ज्यावेळी अजितदादा आणि त्यांचा पक्ष संकटात होता त्यावेळी आत्ताच्या उमेदवारांच्या नेत्यांनी वातावरण फिरल्याचे पाहून अजितदादांच्या पक्षातून पळ काढून अन्य पक्षात प्रवेश केला मात्र ज्यावेळी जनतेने त्यांना साफ नाकारले व वातावरण फिरल्याचे दिसले की पुन्हा संधीसाधूपणा करत अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला. आता पुन्हा दादांच्या आवाजातील क्लिप प्रचारात वाजवून ते जनतेला भावनिक आवाहन करुन भावनिक बनविण्याच प्रयत्न करत आहेत मात्र यावेळी सुद्धा जनता त्यांना साफ नाकारणार आहे असे किरण देशमुख यांनी म्हटले आहे.

जनतेला चांगले माहित आहे की काम करणारे कोण आहे आणि फक्त राजकीय स्वार्थासाठी इकडून तिकडे जाणारे कोण आहे. त्यामुळे दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून दौंड ची जनता राहुलदादांच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करेल यात शंका नाही असा विश्वास किरण देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही जात नव्हे तर योग्यता याहून उमेदवारी देतो, जातीपातीचे राजकारण कुणी केले हे केडगावकरांना चांगले माहित आहे – जातीपातीचा आरोप करणाऱ्या विरोधकांचा किरण देशमुख यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. कुणी कितीही टिका केली तरी आम्ही योग्यता पाहून उमेदवारी देत असतो. विरोधकांना वाटले होते की आम्ही आजच निवडून आलो आहे मात्र ज्यावेळी अभिषेक थोरात यांची उमेदवारी राहुलदादांनी फायनल केली त्यावेळी मात्र विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली ते भांबावून गेले. त्यामुळे ते वाट्टेल तसे आरोप करु लागले मात्र केडगावकरांना चांगले माहित आहे की जातीपातीचे राजकारण कुणी केले. दोन्ही कडून तुल्यबळ उमेदवार असताना तिसरा उमेदवार कुणी उभा केला आणि ऐनवेळी कशा पद्धतीने मते मागीतली. आज तेच लोक आम्ही जातपात करत नाही असा हेका लावून धरत आहेत मात्र सर्वांना माहित आहे की जातीचे राजकारण करुन संधीसाधूपणा कुणी केला असा टोमनाही शेवटी किरण देशमुख यांनी लागवला आहे.