विनायक मेटे यांचे अपघाती निधन, ..तर विनायक मेटे यांचे प्राण वाचले असते! सहकाऱ्यांचे गंभीर आरोप

पुणे : शिवसंग्राम चे प्रमुख विनायक मेटे यांच्या वाहणाला खोपोली जवळ अपघात झाला असून या अपघातात मेटे यांचं निधन झालं आहे. मुंबई-पुणे महामार्गावर ही घटना घडली आहे. खोपोलीच्या माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या भीषण अपघातानंतर जवळपास एक तास मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी केला आहे. तब्बल तासाभरानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचेरुग्णालय प्रशासनाने दिली. या अपघातात मेटे यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि गाडी चालक यांचीही प्रकृती गंभीर होती.

असा झाला अपघात…
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. एका अवजड वाहनाची आणि त्यांच्या वाहनाची धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत असून अवजड वाहनाने कट मारल्याचे त्यांचे सहकारी सांगत आहेत. या भीषण अपघातामध्ये गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.

तर विनायक मेटे वाचले असते…
वाहनात मेटे यांसोबत एकनाथ कदम होते. त्यांनी एका वृत्तवाहिनीला या अपघाताची माहिती देताना प्रशासकीय यंत्रनांनावर गंभीर आरोप केले असून त्यांनी या अपघाताबाबत बोलताना, अपघात होऊन जखमी झालेल्या मी मेटे यांच्याशी बोललो तेव्हा ते माझ्याशी बोलत होते, मात्र तासभर कोणतीच मदत मिळाली नाही. या वेळी 100 नंबरलाही फोन केला मात्र त्यांनी उचलला नाही असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.

विनायक मेटे यांचा जीवन प्रवास..
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago