दुखवायचं तर नाही पण जनतेची कामेही मार्गी लावून घ्यायची… आमदार ‛राहुल कुल’ यांच्या ‛या’ खास शैलीची सर्वत्र चर्चा

पावसाळी अधिवेशन 2023 : अब्बास शेख

पुणे : आपलंच सरकार, आपलेच मंत्री आणि आपल्याच राज्यातील जनतेला भेडसावणारे काही प्रश्न..! मग मार्ग कसा काढायचा, बोललं तर पाहिजे पण असं की साप भी मरे और लाठी भी ना टुटे.. हे कौशल्य अंगी आणणं तसं खूप अवघड आहे. कारण यात कधी कधी आपली हक्काची वरिष्ठ पातळीवरील माणसं दुखावली जाण्याची शक्यता असते मात्र ती रिस्क घेऊन शासन निर्णयाचे स्वागत करून जनतेचे हेही प्रश्न आहेत तेही कृपया मार्गी लावावेत अश्या पद्धतीची मागणी करण्याचे कसब नक्कीच आ.राहुल कुल यांनी आत्मसात केले आहे.

तसे पाहिले तर प्रत्येक आमदार हा आपापल्या तालुक्यासाठी काही न काही करण्याची धडपड करत असतो मात्र दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे नुसता स्वतःचा तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि राज्याला भेडसावणारे विविध प्रश्न वेळोवेळी प्रत्येक अधिवेशनात मांडताना या अगोदरही दिसले आहेत.
सध्याही राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्या आमदार कुल हे आपल्या खास शैलीत मांडताना दिसत आहेत.

आमदार कुल यांनी ग्रामीण भागातील पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, शेतकऱ्यांना भेडसावणारी रात्रीच्या विजेची समस्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्याचे निरसन याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न उपस्थित करताना त्यांनी शासनाने धनगर समाज बांधवांसाठीची मल्हारराव होळकर महामेष योजना सुरू केल्याबाबत तसेच शेतकरी आणि जनतेच्या हितासाठीचे विविध निर्णय घेतले असल्याने राज्यसरकारचे आभार मानायला विसरले नाहीत.

आमदार कुल यांनी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये शासनाकडे मागणी करताना, ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या नियोजनामध्ये बारकाईने लक्ष द्यावं, ग्रामीण भाग व शहरी भागातील दरडोई पाणी वापराबाबत मापदंडामध्ये असलेली तफावत दूर करून ग्रामीण भागावरील अन्याय दूर करावा, ग्रामीण मार्गांच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी केली आहे. याबरोबरच जलसंपदा विभागाच्या विविध समस्यांबाबत त्यांनी मनोगत व्यक्त करताना जलयुक्त शिवार योजना, कृष्णा भीमा स्थिरीकरण, मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडे वळविणे आदी महत्वपूर्ण प्रकल्पाना शासनाने गती द्यावी तसेच चिबड जमिनींचा प्रश्न वर्षानुवर्षे दुर्लक्षित असून याबाबत मापदंड निश्चिती करण्यात यावी, राखीव वने शेरा हटविण्यात यावा, पुरंदर उपसा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनां आदी योजना बंद नळीद्वारे कराव्यात आदी प्रमुख मागण्याही केल्या आहेत.

आमदार कुल हे सत्ताधारी पक्षात आहेत. सत्यधारी पक्षात असतानाही आपल्या तालुका, जिल्हा आणि राज्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची मांडणी योग्यपद्धतीने करून शासनाचे लक्ष वेधत ही कामे मार्गी लावण्याची त्यांची शैली सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
जेथे ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट शासनाच्या लक्षात आणून देऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा फायदा हा राज्यातील शेतकरी आणि जनतेला होऊ लागला आहे यात मात्र शंका नाही.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

16 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago