दौंड : सहकारनामा ऑनलाइन
सत्तेचे वारे बदलत राहते मात्र जनतेचा विश्वास आत्मसात केला तर विजय निश्चित होतो असे प्रतिपादन दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी केले. ते चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मतदार संघाच्या बैठकीत बोलत होते.
आमदार राहुल कुल यांनी आपल्या भाषणात बोलताना पुणे पदवीधर संघाचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कुणीही गाफील न राहता प्रत्येक मतदाराला भेटून तो मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि आपले पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यात आपली भूमिका बजवावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब चोरमले तर प्रास्ताविक दिनेश गडधे यांनी केले. यावेळी निलकंठ शितोळे, डॉ.प्रशांत कोल्हे, वासुदेव काळे, यांची भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, माऊली शेळके, नामदेव बारवकर, गोरख दिवेकर, तानाजी दिवेकर, मोहन म्हेत्रे, शिवाजी दिवेकर, मल्हारीआबा गडधे हे उपस्थित होते.
दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न
तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती
दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…