Daund : जनतेचा विश्वास आत्मसात केला तर विजय निश्चित होतो : आमदार राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

सत्तेचे वारे बदलत राहते मात्र जनतेचा विश्वास आत्मसात केला तर विजय निश्चित होतो असे प्रतिपादन दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी केले. ते चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मतदार संघाच्या बैठकीत बोलत होते.

आमदार राहुल कुल यांनी आपल्या भाषणात बोलताना पुणे पदवीधर संघाचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कुणीही गाफील न राहता प्रत्येक मतदाराला भेटून तो मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि आपले पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यात आपली भूमिका बजवावी असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब चोरमले तर प्रास्ताविक दिनेश गडधे यांनी केले. यावेळी निलकंठ शितोळे, डॉ.प्रशांत कोल्हे, वासुदेव काळे, यांची भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, माऊली शेळके, नामदेव बारवकर, गोरख दिवेकर, तानाजी दिवेकर, मोहन म्हेत्रे, शिवाजी दिवेकर, मल्हारीआबा गडधे हे उपस्थित होते.