Categories: राजकीय

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा द्यावा – आ.राहुल कुल यांची मागणी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा द्यावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

लवकरच महाराष्ट्राला दोन राज्यांतर्गत वंदे भारत गाड्या मिळणार आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते शिर्डी रेल्वे मार्गावर धावतील देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण होणार आहे. यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनची नियमित सेवा सुरू झाल्यानंतर या ट्रेनला दौंड स्थानकात थांबा द्यावा अशी मागणी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दौंड जंक्शन हे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. पुण्याहून अहमदनगर, शिर्डी, मनमाड, भोपाळ आणि नवी दिल्लीकडे जाणार्‍या सर्व उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या या स्थानकावरून जातात, अनेक प्रवासी गाड्यांसाठी हा एक प्रमुख थांबा आहे आणि एक प्रमुख मालवाहतूक केंद्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेन दौंड तसेच आजुबाजूच्या बारामती, इंदापूर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यांना देखील सोयीची ठरेल विशेषत: व्यापारी, सरकारी अधिकारी, कामगार व विद्यार्थ्यांना या ट्रेनचा मोठा फ़ायदा होईल याबाबत रेल्वे राज्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा आपल्याला विश्वास असल्याचे आ.कूल यांनी म्हटले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago