अहमदनगर : अहमदनगर येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथीक अहमदनदर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची माहिती मिळत असून या आगीत रेल्वेचे दोन – तीन डबे जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अजून समजू शकले नाही. या आगीत जीवितहानी झाली की नाही हेही अजून समजू शकले नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. रेल्वेला आग लागल्याची घटना लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
शिराडोह या गावाच्या जवळ रेल्वेला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून दोन डबे यात जळून खाक झाले आहेत. आमच्या प्रतिनिधिकडून अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरु आहे.
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळावी
पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक
फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…
रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते…