वृत्तसंस्था : सहकारनामा ऑनलाईन
यूपीच्या अनुपशहर भागातील पगोना गावामध्ये दोन साधूंच्या झालेल्या हत्येनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार संजय राऊतांनी या घटनेचा निषेध करत या घटनेवर प्रतिक्रीया देताना पालघरच्या घटनेचा दाखला देत योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला याबाबत ठणकावले होते. आता खा. संजय राऊत यांच्या आरोपाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाद्वारे ट्विट करण्यात आले असून त्यामध्ये संजय राऊतांवर निशाणा साधण्यात आला असून महाराष्ट्र सांभाळा उत्तर प्रदेशची चिंता करु नका अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना ट्विटरवरून खडसावलं आहे.
पुढे या ट्विटमध्ये उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे साधूंच्या हत्येच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.असा मजकूर देण्यात आला असून पालघर मधील साधुंच्या हत्येबद्दल कोण राजकारण करत आहे असा सवालही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी खासदार संजय राऊत यांना विचारला आहे.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल