संपादकीय :-
चीनने आगळीक करत आपल्या देशाच्या भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक सैनिकांनी सीमेवर आपले रक्त सांडत त्यांचा प्रतिकार केला आणि आपल्यापेक्षा दुप्पट सैनिकांचा खात्मा करून चीनला जशास तसे उत्तर दिले.
चीन यातून सावरत नाही तोच आता पुन्हा केंद्र सरकारने चिन्यांमध्ये लोकप्रिय असलेले आणि भारतामध्ये आपले प्रस्थ स्थापन करू पाहणाऱ्या सुमारे ५९ चिनी ॲपवर बंदी घातली. भारताने ही बंदी घालताच चीनच्या कंपन्यांमध्ये हडकंप माजला आहे.भारताने केलेल्या डिजिटल स्ट्राईकमुळे चीनच्या धोरणाला लगाम लागला आहे. कारण आपण काहीही केले तरी भारत आपल्याला काहीच करू शकत नाही असा गैरसमज चीन सरकारचा झालेला असावा त्यामुळेच की काय चीनची आगळीक वाढतच चालली होती. भारताने बंदी घातलेल्या ॲपमध्ये टिकटॉक ॲपचाही समावेश असून हे ॲप लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना वेड लावत होते. मात्र चीनचा आततायीपणा पाहून जनतेनेही या ॲपवर घालण्यात आलेल्या बंदीचे स्वागत केले आहे. या ॲपवर खुद्द माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम ६९ (अ) च्या तंर्गत बंदी घातली आहे. याचा अर्थ हे ॲप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिनेही धोकादायक असल्याचे समोर येत आहे. आतातरी चीनने आपली आगळीक बंद करून गुण्यागोविंदाने वागावे अन्यथा जशी ॲपवर बंदी घालून डिजिटल सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्यापेक्षाही मोठे उत्तर भारत देऊ शकते हे आता चीनने लक्षात ठेवायला हवे.
अब्बास शेख.
– मुख संपादक
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल