भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या ‛राजगृह’ निवस्थानावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करा : आमदार राहुल कुल यांची मागणी



 

पुणे : सहकारनामा ऑनलाईन

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर काही समाजकंटकानी काल हल्ला करुन नासधूस केली, या घटनेचा दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच या समाजकंटक आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी केली आहे.

काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यामध्ये याचे पडसाद उमटत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करत समाज कंटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.