आमदार राहुल कुल यांनी राज्य सरकारकडे केलेल्या ‛या’ मागणीलाही आले मोठे यश, राज्य सरकारने घेतला ‛हा’ महत्वपूर्ण निर्णय



मुंबई / दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी राज्यातील आशा सेविका यांचे मानधन वाढवावे अशी मागणी 12 एप्रिल 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून राज्यातील सर्व आशा भगिनी व आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात  कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना मोठा आधार मिळणार आहे.