मुंबई : सहकारनामा ऑनलाइन.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानुसार देशभरात सकाळ पासूनच सर्वत्र शुकशुकाट होऊन जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळत होता. या कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन मोदींनी सर्व नागिरकांना केले होते.
मात्र अनेकांनी थेट घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उतरत टाळ्या आणि थाळ्या वाजवल्याने जनता कर्फ्युच्या मुख्य उद्देशालाच तडा गेला आहे. लोकांनी हे टाळले पाहिजे, आणि रस्त्यावर येऊन, गर्दी करत घोळक्याने रस्त्यावर फिरतानाचे चित्र पहायला मिळाले यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधी आणि जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र जमून घंटानाद करणं अपेक्षित नाही असे सांगितले असून या कृतींमुळे कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या मूळ उद्देशाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटी केले आहे.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल