मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर या मुलाखतीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर जोरदार टीका करत एक नारद आणि शिवसेना गारद असे म्हणून ‛सामना’ आता शिवसेनेचे नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे मुखपत्र झाले आहे असे टीकास्त्र सोडले.
यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार कोरोनाबाबत उपाययोजना न करता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मागे लागले आहे. या संकट समई फोडाफोडी आणि कुरघोडीचे राजकारण करणे योग्य नाही असे म्हणत कोरोनाशी लढा देण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. माजी केंद्रीय कृषिमंत्री जेष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे. सध्या या मुलाखतीचा ‛एक शरद बाकी सर्व गारद’ हा प्रोमो सध्या गाजत आहे त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ‘एक नारद, शिवसेना गारद’ असं टायटल द्याव असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे. सामनाच्या टीकेबाबत बोलताना त्यांनी सामनाच्या टीकेवर आम्ही कधीही प्रतिक्रिया देत नाही. आता हा सामना बाळासाहेबांचा राहिला नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मुखपत्र झाले असल्याची टीका केली.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल