दौंड तालुक्यात भाजपची जोरदार मुसंडी.. सर्व उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास

दौंड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप ने प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे नागरिकांच्या वाढत्या सहभागावरून दिसत आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी दौंड च्या ग्रामिण भागामध्ये आपले दौरे वाढविल्याने भाजप कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळत आहे. जेथे जेथे १ नंबर जाईल तेथे तेथे वातावरण फिरत असल्याचे नागरिकांच्या बोलण्यातून दिसत आहे.

लोकांना तालुक्यात झालेली विकासकामे आणि नियोजित सुरु असलेली विकासकामे दिसत असून तालुक्यात अमूलाग्र बदल घडविण्यासाठी आता जनता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही आपले सर्व  उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करेल आणि तालुक्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मदत करेल असा ठाम विश्वास आमदार राहुल कुल हे व्यक्त करत आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार असून दौंड तालुक्याला भाजप आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमच झुकते माप दिले आहे. आता वळण घेऊन जाण्याची गरज नसून थेट समोरून जावून निधी खेचण्यात आमदार कुल यांना मागील दहा वर्षांत मोठे यश आले आहे. दौंड तालुक्याचा झपाट्याने विकास होण्याचे मागे थेट फडणवीस यांचा हात आहे. त्यामुळे आता तालुक्यात विविध विकासकामे होण्यासाठी कसलाही अडसर राहिला नाही असे मत भीमा पाटस चे संचालक अप्पासाहेब हंडाळ यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

दौंड तालुक्यात राहू-खामगाव, यवत-बोरीभडक, बोरिपार्धी-केडगाव, वरवंड-पारगाव, पाटस-कुरकुंभ, गोपाळवाडी-कानगाव आणि खडकी-देऊळगाव राजे या जिल्हा परिषद गटांमध्ये भाजप ने प्रचारात जोरदार मुसंडी घेत आपले विकासाचे बिग व्हिजन नागरिकांच्या समोर मांडले आहे. राहुलदादा आणि विकास हे एक समीकरण बनले आहे हे खडकी देऊळगाव राजे गटातील भाजप उमेदवार आणि राष्ट्रवादी चे माजी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले आहे.

जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकास करायचा असेल तर या समीकरणाला साथ देण्याशिवाय पर्याय नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आमदार कुल यांच्या विचारांचे उमेदवार निवडून गेले तर मोठा विकासात्मक बदल घडेल या आशेने अनेकांचा कल हा भाजपकडे असल्याचे दिसत आहे.