मुंबई :
देशात आलेली बर्ड फ्लू (Bird Flu) ची साथ आता महाराष्ट्रातही दाखल झाली असल्याने या साथीला रोखण्यासाठी राज्य सरकार ही तत्पर झाले आहे.
बर्ड फ्लू चा धोका ओळखून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जनतेला आवाहन करताना तुम्ही
चिकन, अंडी खाताना ते सत्तर डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास शिजवावे आणि मगच खावे असा सल्ला दिला आहे.
हे आवाहन करतानाच त्यांनी बर्ड फ्ल्यू Bird Flu बाबत कोणतीही शहानिशा न करता कसल्याही अफवा पासरविल्यास अशा लोकांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मंत्री सुनील केदार यांनी हे आवाहन एका पत्रकार परिषद केले आहे.
राज्यात बर्ड फ्लू Bird Flu च्या साथीला परभणीतून सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात अन्य ठिकाणी अजून तरी याबाबतपुरावे सापडलेले नाहीत.
राज्यात ह्या भयंकर असणाऱ्या साथीचे निदान अजून झालेले नाही त्यामुळे अंडी आणि चिकन तुम्ही खाऊ शकता परंतु ते किमान 70 ते 80 डिग्री तापमानावर अर्धा तास शिजवलेले असावे आणि नंतर खावे असे त्यांनी सांगताना हे आपण सांगत नसून हे संशोधनातून सिद्ध झाले आहे असे केदार यांनी सांगितले आहे.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल