जर आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नव्हतं तर त्याला 25 दिवस कोठडीत का ठेवलं! : खा.सुप्रिया सुळे

पुणे : आर्यन खान याच्याकडे जर ड्रग्ज सापडलं नव्हतं, त्याने ड्रग्ज घेतलं नव्हतं तर मग त्याला 25 दिवस कोठडीत का ठेवलं असा सवाल उपस्थित होतो असं म्हणत एक आई म्हणून मला हे खूप वाईट वाटत असं विधान खा.सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलं.

याबाबत जे घडलं त्यावरून देशाचंही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब होत असे म्हणत त्यांनी शाहरुख खान हा फक्त राज्य किंवा देशा पुरता मर्यादित कलाकार नसून तो आंतरराष्ट्रीय कलाकार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या घडामोडी जाणून घेताना आपल्या देशाचं नाव खराब होत असे त्यांनी सांगितले.

आर्यन खान प्रकरणी जे घडलं ते थोडं अविश्वसनीय असल्याच सांगताना त्याने जर ड्रग्ज जवळ बाळगले नव्हते, त्याने ड्रग्ज घेतलेही नव्हते तर मग त्याला इतके दिवस कोठडीत ठेवणे आणि चूक नसतानाही जर अशी कारवाई अधिकारी करत असतील हे चुकीचं आहे असे त्यांनी म्हटले.

भाजप आणि त्यांच्या राज्यातील नेत्यांच्या वक्तव्याबाबत बोलताना आमच्यावर संस्कार झाले आहेत त्यामुळे आम्ही हीन भाषेचा वापर करत नाही पण काहींना संस्कार माहीत नसावेत त्यामुळे ते अभद्र भाषेचा वापर करता असे म्हणून देशात वाढत असलेली महागाई आणि पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर पाहता हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे असेच म्हणावे लागेल असे शेवटी त्यांनी सांगितले.