अब्बास शेख
बारामती : रात्री उशिरापर्यंत शासकीय निर्णय घेण्याच्या बैठका आणि सकाळी सकाळी उठून कामाचा धडाका अशी ख्याती असलेले अजितदादा आपल्यात नाहीत यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. आज बुधवारी सकाळी त्यांच्या विमानाचा बारामतीजवळ अपघात झाला आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली. मात्र हा अपघात कसा झाला, काय काय घडलं हे आता तेथील प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिन्यांना मुलाखत देताना अजितदादांच्या अकाली जाण्याने आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
नेमका कसा झाला अपघात.. राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी अजितदादा विविध ठिकाणी दौरे करत होते. त्याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे येत होते. याच दरम्यान विमान लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यावेळी अजितदादांसह पाचजण या विमानात होते. यात या सर्वांचा मृत्युझाल्याची दुःखद घटना घडली आहे.
मात्र हा अपघात कसा घडला याबाबत येथील प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने माहिती देताना, पहिल्यांदा विमान वरुन गेलं.. त्यानंतर विमान खालून येऊ लागलं मात्र नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. याबाबत एबीपी माझा ने ही महिलेची प्रतिक्रिया घेतली आहे.
विमान अपघात झाला त्यावेळी या विमानात अजितदादा पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक हे होते.






