20 एप्रिलनंतर राज्यातील उद्योग सुरू होणार, मात्र या ठिकाणचे उद्योग सुरू होणार नाहीत



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाउनची घोषणा करण्यात आली. मात्र आता राज्यातील काही भागांमधील उद्योग, धंदे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.  20 एप्रिलनंतर राज्यात काही ठिकाणी उद्योग सुरू करण्यात येणार असले तरी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वसई, विरार, भिवंडी, पुणे, चिंचवड तसेच नागपूर या भागांत उद्योग सुरू करता येणार  नाहीत असे उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्राच्या सूचनांनुसार राज्यातील उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने तयारी सुरू केली आहे. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग व आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली यामध्ये ज्या भागामध्ये करोनाचा कमी संसर्ग आहे किंवा संसर्ग झालेलाच नाही अशा  भागांमध्ये उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना उद्योग विभागाच्या सचिवांना करण्यात आल्या आहेत.

कामगारांसाठी उद्योगांच्या आवारातच व्यवस्था करावी लागणार :

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी जे उद्योग आपल्या कामागारांना कारखान्याच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, त्यांना परवानागी दिली जाईल. जे उद्योग नियम पाळतील व वाहतुकीची व्यवस्था करतील त्यांनी देखील सूट दिली जाईल. 

या बैठकीत सुभाष देसाई यांनी राज्यातील उद्योगांचा आढावा घेतला. उद्योगांना आर्थिकदृष्ट्या चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन येत्या 20 तारखेनंतर राज्यातील कोणत्या भागांतील उद्योग सुरू करता येतील याचा आढावा घेऊन एक सूत्र तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात कोरोनामुळे प्रतिबंध लागू आहेत अशा ठिकाणी उद्योग सुरू करता येणार नाहीत. तसेच इतर ठिकाणी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून परिस्थितीनुसार उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी जाहीर केले असून याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

कृषी आधारित उद्योगांनाही  प्राधान्य दिले जाणार :

शेती आधारित उद्योगांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामांसाठी मदत होणार आहे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

21 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago