राज्यात 2 दिवसांचा लॉकडाउन – नवाब मलिक, या दोन दिवसाला ‛लॉकडाउन’



– सहकारनामा

मुंबई : राज्यात 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढतायत त्यामुळे राज्यात शनिवार, रविवार लॉकडाउन राहणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळात एक मताने झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व ठिकाणी नाईट कर्फ्यु असेल असे त्यांनी जाहीर केले आहे.

तसेच राज्यात विकेंड लॉकडाउन म्हणजे शनिवार, रविवार लॉकडाउन असणार आहे. आणि बार, हॉटेल, मॉल बंद राहणार आहे. हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा करून हे निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.