नागपूर : नागपूर येथे जोरदार पाऊस झाल्यानंतर नाग नदीला आलेल्या महापुरात सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून प्रत्येकाच्या घरात चिखलच चिखल दिसत आहे. हा चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानी संदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तात्काळ मदत देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील भेटीत दिले आहे.
नागपूर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागपूरच्या अंबाझरी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि घरातील अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना त्यांनी भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.
सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले असून या नुकसानी संदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. झालेल्या नुकसानी संदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या, जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. तासात 109 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यास येतील असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री फडणीस यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी अंबाझरी तलाव, नाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी, डागा लेआउट, शंकर नगर आदी सर्व भागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी महापौर संदीप जोशी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा